मार्च एण्ड वसुली! वर्षभर काय?

मार्च एण्ड वसुली! वर्षभर काय?

केवळ जालनाच नव्हे तर अवघ्या राज्यभरात मार्च एण्ड निमित्ताने वसुलीसाठी विविध विभागांमार्फत पथकेच्या पथके कार्यालयाबाहेर पडली आहेत. यातील महावितरणसंदर्भात तर सांगायलाच नको, मार्च एण्ड म्हटलं […]

केवळ जालनाच नव्हे तर अवघ्या राज्यभरात मार्च एण्ड निमित्ताने वसुलीसाठी विविध विभागांमार्फत पथकेच्या पथके कार्यालयाबाहेर पडली आहेत. यातील महावितरणसंदर्भात तर सांगायलाच नको, मार्च एण्ड म्हटलं की, थेट वीज कनेक्शन बंद करून त्या घराला अंधारात ढकलण्याचा धंदा या विभागाकडून जोरादार सुरू करण्यात आला आहे. मार्च एण्डला वसुलीसाठी जोरकस प्रयत्न करणार्‍या या महावितरणचे अधिकारी-कर्मचारी-लाईनमन नेमके वर्षभर करतात तरी काय? हा प्रश्‍न नेमका वसुलीच्या अनुषंगाने आहे. हा प्रश्‍न निर्माण होतो. जर या महावितरणच्या अधिकारी वर्गाने आणि लाईनमनने महिन्याच्या महिना वसुलीसाठी प्रयत्न केले तर अशी पथके घेऊन फिरण्याची वेळ महावितरणवर येणार नाही. आणि कुणालाही अंधारात ठेवायची गरज पडणार नाही. बर यातही या कार्यालयाकडून भेदभाव केला जातो हे विशेष वसुली जर एखाद्या राजकीय नेत्यांकडे, मोठ्या व्यापार्‍याकडे, अथवा इतर प्रतिष्ठित असलेल्यांकडे जर असेल तर त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जात नाही. केवळ गरिब, मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटूंबियांच्या वसुलीकडे यांचा कल अधिक प्रमाणात असतो. लाईनमन अथवा या विभागात काम करणार्‍या व्यक्ती तसे पाहिले तर जीवावर उदार होऊन वीजेची काम करतात म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, हेच लोकं आकडे बहाद्दरांवर कारवाई करत नाहीत. मीटरमध्ये छेडछाड करणार्‍यांकडे लक्ष देत नाहीत. उलट त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन शांत राहतात. हे कितपत योग्य आहे. जालना शहरात सध्या महावितरणची पथकेच्या पथके वीज बील वसुलीसाठी फिरत आहेत. ते अयोग्य नसले तरी त्यांनी केवळ सर्वसामान्यांवरच नव्हे तर सरसकट कारवाई केल्यास त्यांचे स्वागतच…

Tags:

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!