शहरात डेंग्यूचे थैमान नगर पालिकेची बघ्याची भुमिका; राष्ट्रवादी कडून वाजतगाजत भीकमागो आंदोलन

शहरात डेंग्यूचे थैमान नगर पालिकेची बघ्याची भुमिका; राष्ट्रवादी कडून वाजतगाजत भीकमागो आंदोलन

परतूर । प्रतिनिधी – गेल्या दोनतीन महिन्यापासून परतूर शहरात डासांची संख्या वाढल्याने, नागरिकांना ताप, मलेरिया, चिकन गुनिया, डेंग्यू सारख्या आजाराने ग्रस्त असताना नगरपालिकेने मात्र कोणतीही […]

परतूर । प्रतिनिधी – गेल्या दोनतीन महिन्यापासून परतूर शहरात डासांची संख्या वाढल्याने, नागरिकांना ताप, मलेरिया, चिकन गुनिया, डेंग्यू सारख्या आजाराने ग्रस्त असताना नगरपालिकेने मात्र कोणतीही उपाययोजना न केल्याने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस ने शहरात वाजत गाजत भिक मागो आंदोलन करत नगरपालिका कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली.

मराठा आणि कुणबी हे समकक्ष आणि एकच ! डॉ. संजय लाखे यांनी समितीला दिलेले निवेदन जसेच्या तसे….

गेल्या अनेकमहिन्यांपासून परतूर नगरपालिकेचा कारभार ढासळलेला आहे. सध्या नागरिक डास वाढल्याने त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा नागरिकांनी धूर फवारणी करण्याची मागणी करूनही पालिका प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. राष्ट्रवादीकडून या अगोदर ही जंतुनाशक फवारणी करावी यासाठी निवेदन देऊन ही काही उपयोग न झाल्याने ,बुधवारी गाव भागात राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते कपिल भैय्या आकात यांच्या मार्गदर्शनाखाली , वाजत गाजत भीक मागून आंदोलन करत नगरपालिकेच्या डोळ्यात अंजन घालण्यात आले.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे विनायकराव काळे, अंकुशराव तेलगड, विजय नाना राखे, अखिल काजी, सय्यद आरेफ अली, कदीर कुरेशी, परवेज देशमुख, रजाक कुरेशी, संजय राऊत, सत्यम मगर, काजी सर, लाला मिया बागवान, अन्वर पठाण, निसार चाऊस, गोरे मिया कायमखानी सह अनेकांनी सहभाग घेतला.यानंतर नगरपालिकेला उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देणारे निवेदनही देण्यात आले.

Related Posts

LatestNews

‘अक्षय तृतीया’च्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनानी सतर्क रहावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
शेतकरी आत्महत्या मदतीची प्रलंबित प्रकरणे एक महिन्यात मार्गी लावा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
“TECH- वारी : डिजिटल प्रशासनाकडे महाराष्ट्राची आत्मविश्वासपूर्ण वाटचाल”
सामुहिक वनहक्क पट्टेधारकांना स्वतंत्र सातबारा द्या – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांत्वन
महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन