मनपाच्या त्या जाहीर आवाहननंतर नागरिकांचे आक्षेप दाखल; त्या रस्त्यावरील बाजार बंद करण्यात यावा...
By Yuva Aadarsh
On
जालना । प्रतिनिधी- जालना शहर महानगर पालिकेच्यावतीने शहरातील रविवार रोजीचा आठवडी बाजार भरवण्याबाबत जाहीर आवाहन प्रसिद्ध करण्यात आले होते त्यावर आक्षेप मागविण्यात आले. यावर शहरातील नागरिकांनी आक्षेप दाखल केला असून गांधी चौक ते रेल्वे स्टेशन मार्गावरील बाजार बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

आपल्याकडे पाच उपायुक्त असून ते जालना शहराचा विकास आराखडा बनवून शहर अत्यंत सुंदर शहर बनवू शकतात.
गांधी चौक ते रेल्वे स्टेशन या रस्त्यावरील रविवारचा बाजार बंद करण्यात येऊन बाजूला जे सर्व्हे नंबर लेआऊट मधील मोकळ्या जागा आहे. त्यात हा बाजार भरवण्यात यावा त्यामुळे आजारी नागरिक, सहनशील जनतेचा त्रास व मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होऊ शकेल.
आक्षेप निवेदनावर रमेश देहेडकर, सौ.रसना देहेडकर, दिनकर घेवंदे, शेख नईम आणि अनेक त्रस्त नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.

About The Publisher
