पत्रकारांपासून दूर राहतो, पहिले सांगितले असते तर रुग्णालयात दाखल केले नसते; व्वा.. रे... डॉक्टर...
आस्था हॉस्पीटलची पत्रकारांबद्दल हिन भावनेचा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाच्यावतीने निषेध
26 जून रोजी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आस्था हॉस्पीटलच्या पत्रकारांबद्दलच्या हीन भावनेचा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात येत असून शुक्रवार (दि 26) रोजी हॉस्पीटल प्रशासन व डॉ. पाटील यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकारी जालना यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी म्हटले आहे. सदरील व्हिडीओ प्राप्त करण्यासाठी 8390098886 या क्रमांकावर ‘हॉस्पीटलचा व्हिडीओ सेंड करा’ असा मॅसेज केल्यास ‘हा’ व्हिडीओ पाठविण्यात येईल.
जालना । प्रतिनिधी - शहरातील नामांकित असलेल्या आस्था हॉस्पीटल हे पत्रकारांच्या रुग्णांपासून दूर राहते, जर पत्रकार म्हणून या हॉस्पीटलमध्ये गेल्यास रुग्णास दाखलच (अॅॅडमिट) करून घेत नसल्याचे दस्तुरखुद्द आस्थाचे डॉ पाटील यांनीच म्हटले आहे. विशेष म्हणजे केवळ एकाच पत्रकाराबद्दल नव्हे तर सर्वच पत्रकारांबद्दलची त्यांची भूमिका तशीच असल्याचे ते बोलतांना एका व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. रुग्णांसाठी डॉक्टर म्हणजे एक प्रकारे देवच. आणि हॉस्पीटल म्हणजे देवालय. असे म्हणतात रुग्ण सर्वसामान्य, गरीब असो अथवा पत्रकारांचा नातेवाईक डॉक्टरांवर रुग्ण बरा व्हावा म्हणून एकप्रकारे सर्वांचीच आस्था असते, मात्र, पत्रकारांनी आता हॉस्पीटलवर ‘आस्था’ ठेवू नये असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
असे असले तरी काही हॉस्पीटलमध्ये रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले लावून वसुलीचा जणू काही धंदाच सुरु असल्याचे अनेक तक्रारीवरुन स्पष्ट होत आहे. सदैव रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टरांनी पत्रकारांबद्दल असे वक्तव्य करणे कितपत योग्य आहे? योजनेत उपचार सुरु असतांना केवळ पन्नास हजार रुपये योजनेत मिळणार असल्याचे सांगून इतर खर्च रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावा लागेल या शर्थीवर रुग्णांचे उपचार आस्था हॉस्पीटलमध्ये केल्या जात आहे. केवळ डॉक्टरांचाच खर्च नव्हे तर मेडीकलचा खर्चही वसुल करण्याची तयारी हॉस्पीटल प्रशासन करते आहे. शासन जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब जनतेचे उपचार मोफत व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. जवळपास 900 वर आजारावरील खर्च योजनेच्यामाध्यमातून शासन हॉस्पीटल प्रशासनाला देते. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हावार डीएम नियुक्त करण्यात आलेले आहे. हॉस्पीटल प्रशासनाकडून अनेक वेळा योजनेत असल्यानंतरही पैशाची मागणी होते यासंदर्भातील अनेक तक्रारी आहेत. जालना येथील डीएम डॉ. सानप यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीचे निराकरण ते करतात. डॉ. सानप यांच्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांना हॉस्पीटल प्रशासनाने अधिकचे घेतलेले पैसे परत केलेले आहेत. त्याचे काम चांगले आहे. असे असले तरी केवळ पैसे परत केल्यानंतर समस्या पूर्णपणे दूर होत नाही. हॉस्पीटल प्रशासन पुन्हा तेच पाढे गिरवितात. त्यामुळे अशा हॉस्पीटलवर कारवाई होणे गरजेचे आहे. त्यासाठी डॉ. सानप यांनी प्रयत्न करावेत.
एका रुग्णांचा जीव गेल्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून जवळपास 67 हजार रुपये जमा केल्यानंतरच मृतदेह ताब्यात देणार असा पावित्रा आस्था हॉस्पीटलने घेतला होता. रुग्णाचा नातेवाईक पत्रकार असल्याने संबंधीत पत्रकाराने जिल्हा शल्य चिकित्सक, जन आरोग्य योजनेचे डीएम यांच्याशी फोन वर चर्चा करून हॉस्पीटलमधील आपबीती सांगितली. यावर हॉस्पीटल प्रशासनाला विचारणा झाली. त्यानंतर हॉस्पीटल प्रशासनातील डॉ. पाटील यांनी मृतदेह रुग्णांच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिला. तत्पुर्वी त्यांनी त्या पत्रकाराशी संवाद साधला आणि त्यात त्यांनी स्पष्ट केले की, माझा यात लॉस आहे, योजनाचे पैसे तीन महिन्यांनंतर मिळतात. मी आपल्याला मदत करण्याच्या दृष्टिने उपचार केले. पत्रकार आहे हे आधी माहिती असते तर रुग्णाला अॅडमीट करून घेतले नसते, पत्रकार हे असेच असतात. पत्रकार लोकं ऐनवेळी अचानक त्यांचा मुड चेंज होतो. पत्रकारांना मी घेत नाही. पत्रकारांसाठी मी दोन-तीन कॅम्प घेतले मात्र, त्याचे अनेक प्रॉब्लेम असतात म्हणून त्यांच्यापासून थोडेसे दूर राहतो. आस्था हॉस्पीटलच्या डॉ. पाटील यांच्या या भूमिकेमुळे सर्वच पत्रकारांची बदनामी होत असल्याने आस्था हॉस्पीटलवर त्वरीत कारवाई करावी अशी मागणी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्रचे जालना जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी केली आहे. श्री शेळके यांनी आस्था हॉस्पीटलच्या पत्रकारांबद्दलच्या हिन भावनेचा निषेधही व्यक्त केला.

About The Publisher
