‘त्या’ प्रकरणात पत्रकारांची निदोष मुक्तता सहा मुद्द्यांवर मा. न्यायालयाचे नकारात्मक शेरे; फिर्यादीच्या कामकाजावर ओढले ताशेरे

‘त्या’ प्रकरणात पत्रकारांची निदोष मुक्तता सहा मुद्द्यांवर मा. न्यायालयाचे नकारात्मक शेरे; फिर्यादीच्या कामकाजावर ओढले ताशेरे

जालना । प्रतिनिधी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील प्रभारी उप प्रादेशिक अधिकारी डॉ. योगिनी अविनाश बाळंके यांनी जुलै 2020 मध्ये चंदनझिरा पोलिसात दाखल केलेल्या गुन्हयातील पत्रकारांची अतिरिक्त सत्र न्यायाधिश किशोर जैस्वाल यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली. निकालपत्रात श्रीमती योगिनी बाळंके यांच्या कार्यपध्दतीसह एकंदरीतच तक्रार आणि गुन्हा दाखल होण्यास झालेला विलंब याविषयी शंका उपस्थित करण्यात आल्याने तक्रारी विषयीच संभ्रमावस्था आहे अशी माहिती अ‍ॅड. लक्ष्मण उढाण, अ‍ॅड. महेश धन्नावत आणि अ‍ॅड. योगेश खरात यांनी दिली.

या गाजलेल्या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील प्राभारी उप प्रादेशिक अधिकारी श्रीमती योगिनी बाळंके यांनी ता.31 जुलै 2020 रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्यात जालन्यातील तीन पत्रकार अनुक्रमे अर्पण गोयल, भरत मानकर, विष्णू कदम आणि निळकंठ कुलकर्णी अशा चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला. त्यांच्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, बदनामी करणे शिवाय हे सर्व काही संगनमताने केले असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. 
‘चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्री. गोयल आणि श्री. मानकर यांना अटक केली, तर श्री. कदम यांचा अटकपुर्व जामीन मंजूर झाला. दरम्यानच्या काळात तपास पुर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान तक्रारदार श्रीमती योगिनी बाळंके याच्यासह साक्षीदार अनिल एखंडे, कल्याणी झाडपिडे, आणि रावसाहेब सिरसाठ यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्या बरोबरच साक्षीदारांचे जवाब, प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि मजकुरासह दोषारोपपत्र दाखल झाल्याने सर्वच आरोपिंनी आरोप फेटाळल्याने सविस्तर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणी दरम्यान सरकार पक्षातर्फे उपस्थित करण्यात आलेले मुद्ये आणि फिर्यादी श्रीमती योगिनी बाळंके यांनी तक्रारीतून केलेले आरोप अशा सहाही मुद्यावर न्यायालयाने नकारात्मक शेरे मारत फिर्यादीच्या कामकाजावरही ताशेरे ओढले. फिर्यादीच्या कार्यालयापासून पोलीस ठाणे अवघ्या एक दोन किलोमीटर अंतरावर असतांना तक्रार दाखल करण्यास तीन-चार दिवसांचा विलंब का झाला असा गंभीर प्रश्नही उपस्थित करण्यात आला. त्याबरोबरच तक्रारकर्त्या श्रीमती योगिनी बाळंके या उच्च शिक्षित असून त्यांनी या प्रकरणी बातम्या प्रसिध्द झाल्याने त्याच्या नाराजीतून विचाराअंती म्हणजे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केला असल्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली. विशेष म्हणजे आरोपी पत्रकारांनी त्यांच्या कार्यालयात घुसुन गोंधळ घातला तसेच नोंदवहीत नोंद केली नाही सरकारी कामात अडथळा निर्माण केला या आणि अन्य आरोपांच्या पृष्ठयार्थ सबळ पुरावे देण्यास फिर्यादी कमी पडल्याचे न्यायालयाचे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे जालना शहरातील प्रदुषण नियंत्रण करणे हे फिर्यादीचे आद्य कर्तव्य असतांना त्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलेच शिवाय प्रदूषणाचा प्रश्न निर्माण करणार्‍या कारखान्यांच्या आस्थापना विरोधात किंवा कारखाना मालकांच्या विरोधात ठोस कारवाई करण्या ऐवजी तो प्रश्न प्रभावी पणे मांडणार्‍या या पत्रकारांच्या विरोधात तक्रारी गुन्हे दाखल केल्याचे निकालात नमूद करण्यात आले.

Read More पत्रकारांपासून दूर राहतो, पहिले सांगितले असते तर रुग्णालयात दाखल केले नसते; व्वा.. रे... डॉक्टर...

जालना प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्र. उपप्रादेशिक अधिकारी श्रीमती योगिनी बाळंके यांनी मा. न्यायालयात कुठलेही ठोस पुरावे सादर करू न शकल्यामुळे मा. न्यायालयाने या प्रकरणातील पत्रकारांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Read More ‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन

LatestNews

‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन
शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम 
राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; औरंगाबाद, लातूर विभागात अनंत भालेराव पुरस्कार महेश जोशी यांना जाहीर
गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावागावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
मंत्रिमंडळ निर्णय; महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग