वारी हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक; अबू आजमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करा: आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

वारी हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक; अबू आजमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करा: आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

अबू आजमीला महाराष्ट्रात दंगली घडवायचे आहेत का?
अबू आजमी च्या डोक्यावर परिणाम, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले; महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा त्यांचा प्रयत्न 
वारी वर्षभरातून एकदा, वारी हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक; वारीला नाव ठेवण्याच काम अबू आजमी सारखी औरंगजेबाचे तूष्टीकरण करणारे लोकच करू शकतात

जालना | प्रतिनिधी - वारीमुळे लोकांना त्रास होतो हे अबू आझमी यांचे वक्तव्य मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीसारखे असून नक्कीच अबू आझमी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना महाराष्ट्रातील शांतता भंग करायची आहे का? दंगली पेटवायचे आहेत का? असेच त्यांच्या वक्तव्यावरून वारंवार दिसून येते त्यामुळे अशा  मानसिक संतुलन बिघडलेल्या आणि महाराष्ट्राची शांतता भंग करू पाहणाऱ्या अबू आजमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

वारीला 700 वर्षाची परंपरा आहे, वारीमध्ये अठरापगड जातीचे लोक एकमेकांना माऊली म्हणत आदरानं सन्मानाने विठूरायाच्या दर्शनाला जातात. छत्रपती संभाजी राजांच्या काळात वारीला तत्कालीन मुस्लिम शासकाकडून त्रास होत होता म्हणून स्वतः संभाजी राजांनी संरक्षण दिलं होत. वारी वर्षभरातून एकदा असते, वारी हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक आहे ही बाब अबू आझमी यांच्या आयुष्यभर लक्षात आली नाही आणि येणारही नाही त्यांना केवळ औरंगजेबाचे तूष्टीकरण करायचे आहे परंतु ज्या औरंगजेबाच्या तूष्टिकरण अबू आजमी करत असतात त्या औरंगजेबाला छत्रपती संभाजी राजांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडलं आहे हा इतिहास अबू आजमी विसरले आहेत असेही आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

वारीमध्ये गरीब श्रीमंत लहान-मोठा असा कुठलाही भेदभाव वारीत नाही, 70 - 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसापासून उच्चशिक्षित लोकांपर्यंत सर्वजण वारीत सहभागी होतात. महाराष्ट्रातील महाराष्ट्र बाहेरील व जगभरातील लोक वारी काय आहे हे समजून घेण्यासाठी वारीत सहभागी होतात. सर्व जाती धर्माचे लोक वारीमध्ये सहभागी होतात त्यात थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु मुस्लिम बांधवांचा देखील सहभाग असतो. जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य अबू आजमी सातत्याने करत असतात. ज्या वारकऱ्यांमुळे कुणालाही त्रास होत नाही, जे वारकरी स्वतः त्रास सहन करत विठुरायाच्या दर्शनाची आस मनात ठेवून पंढरपूरला जातात त्यांच्याबद्दल अशी गरळ ओकण्याचा धंदा केवळ अबू आजमीच करू शकतात, असेही आमदार लोणीकर यावेळी म्हणाले.

Read More ‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन

जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य वारीच्या निमित्ताने करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच अबू आजमी यांनी तमाम वारकऱ्यांची माफी मागावी. वारीसाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दिंडी मार्ग तयार केला आहे त्यामुळे वारीचा त्रास होण्याचा प्रश्न येत नाही. वारीमध्ये पोलिसांवर कोणताही ताण पडत नाही, वारीमध्ये महिला पोलिसांना कुठलाही त्रास होत नाही, हे औरंगजेबि विचाराच्या अबू आजमी ला कधीच कळणार नाही. सामाजिक तेढ निर्माण करून जर वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार असेल असेही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

Read More लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन

LatestNews

‘त्या’ डॉक्टरांची डिग्री रद्द करून प्रॅक्टीस बंद करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाचे निवेदन
शेतकर्‍यांच्या आंदोलनाचे अब तक छप्पन्न! तर शासन-प्रशासनाचे पहिले पाढे पंचावन्न!!; खोतकर साहेब... अधिवेशनापुर्वी प्रशासकीय कामकाजाचा फक्त एक दिवस शिल्लक, काय तो सोक्ष-मोक्ष लावा - राठी
राज्यातील सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार – गृहराज्यमंत्री योगेश कदम 
राज्याची कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्य शासनाकडून उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर ; औरंगाबाद, लातूर विभागात अनंत भालेराव पुरस्कार महेश जोशी यांना जाहीर
गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी गावागावात क्रीडा सुविधांसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
मंत्रिमंडळ निर्णय; महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग