वारी हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक; अबू आजमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करा: आमदार बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
अबू आजमीला महाराष्ट्रात दंगली घडवायचे आहेत का?
अबू आजमी च्या डोक्यावर परिणाम, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले; महाराष्ट्रातील शांतता भंग करण्याचा त्यांचा प्रयत्न
वारी वर्षभरातून एकदा, वारी हे राष्ट्रीय एकात्मतेचे आणि सामाजिक समतेचे प्रतीक; वारीला नाव ठेवण्याच काम अबू आजमी सारखी औरंगजेबाचे तूष्टीकरण करणारे लोकच करू शकतात
जालना | प्रतिनिधी - वारीमुळे लोकांना त्रास होतो हे अबू आझमी यांचे वक्तव्य मानसिक संतुलन बिघडलेल्या व्यक्तीसारखे असून नक्कीच अबू आझमी यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना महाराष्ट्रातील शांतता भंग करायची आहे का? दंगली पेटवायचे आहेत का? असेच त्यांच्या वक्तव्यावरून वारंवार दिसून येते त्यामुळे अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या आणि महाराष्ट्राची शांतता भंग करू पाहणाऱ्या अबू आजमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्य वारीच्या निमित्ताने करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करावा तसेच अबू आजमी यांनी तमाम वारकऱ्यांची माफी मागावी. वारीसाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र दिंडी मार्ग तयार केला आहे त्यामुळे वारीचा त्रास होण्याचा प्रश्न येत नाही. वारीमध्ये पोलिसांवर कोणताही ताण पडत नाही, वारीमध्ये महिला पोलिसांना कुठलाही त्रास होत नाही, हे औरंगजेबि विचाराच्या अबू आजमी ला कधीच कळणार नाही. सामाजिक तेढ निर्माण करून जर वारीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार असेल असेही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले.

About The Publisher
