माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास

माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून तांड्यांचा कायापालट होणार; तांड्यांना ग्राम पंचायतीचा दर्जा मिळवून देणार - योजनेचे अशासकीय सदस्य अर्जुन राठोड यांना विश्वास

सर्वच तांड्यातील समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार -अर्जुन नायक राठोड अर्जुन राठोंडच्या उपस्थितीत पार पडली बैठक

परतुर । प्रतिनिधी - जिल्ह्यातील लमान तांड्यांना सुख सुविधांनी समृध्द करण्यासाठी शासनाने विविध योजना राबविल्या असुन  त्याच अनुषंगाने आज अशासकीय सदस्य अर्जुन नायक राठोड यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकार्‍यांसह ग्रामपंचायतच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक पार पडली, यावेळी बंजारा बांधवांच्या विविध समस्या आणि समृध्दी बाबत अर्जुन नायक राठोड यांनी आपले मनोगत व्यक्त करून बंजारा बांधवांना समृध्द करण्यासाठी जे जे प्रश्‍न आहेत, ते मांडून बंजारा समाजाचे असलेले विविध प्रश्‍न मांडून संबंधीतांचे लक्ष वेधून त्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार हेच दाखवुन दिले आहे.
 
पंचायत समिती परतूर येथे संत सेवालाल महाराज बंजारा, लमान तांडा समृद्धी योजना अंतर्गत तांड्याना महसूली दर्जा देऊन ग्रामपंचायत निर्माण करण्या संबंधी आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अर्जुन राठोड अशासकीय सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय जालना परतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, श्री . राजेश तांगडे साहेब, ग्रामपंचायत अधिकारी,  उपस्थित होते. या बैठकीस तालुकास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य श्री नवनाथ आढे , अनिल राठोड , कैलास चव्हाण , यांच्या सह समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते, या वेळी मा जिल्हाधिकारी महोदयानी दिलेल्या 28 मार्च या अंतिम तारखेच्या पूर्वी, परतूर तालुक्यातील सर्व प्रस्ताव तयार करून जिल्हा समितीकडे सादर करण्या संबंधी सूचना यावेळी गटविकास अधिकारी परतूर यांनी सर्व संबंधीत अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. 
 
 

LatestNews

राज्यातील सर्व पुल व साकवांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल तातडीने सादर करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले
राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या
मंत्रिमंडळ निर्णय ; महाॲग्री-एआय धोरण मंजूर, गावागावात हवामान केंद्रांची उभारणी; महावेध प्रकल्पास पाच वर्षांची मुदतवाढ
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करा – मंत्री छगन भुजबळ
परदेशी विद्यापीठाच्या आगमनाने भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र होण्याच्या मार्गावर
२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन” म्हणून साजरा होणार
शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार