मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!

 मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!

जालना । प्रतिनिधी - अर्जुननगर येथील जॉन्सन पाखरे यांच्या मालकीच्या रिकाम्या प्लॉटवर पावसामुळे पाणी साचले. या पाण्याचा निचरा करण्याऐवजी महापालिका प्रशासनाने नागरिकालाच 1 लाख 15 हजार रुपयांचा खर्च दाखवून त्याची भरपाई करण्यासाठी नोटीस पाठवली. या तुघलकी निर्णयामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, आयुक्तांच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे.

पावसामुळे जॉन्सन पाखरे यांच्या मातीच्या घरात पाणी शिरले व घर कोसळले. गोठ्यातील म्हशी पाण्यात उभ्या राहिल्याने जनावरांचेही हाल झाले. अशा परिस्थितीत मदत करण्याऐवजी महापालिकेने 65,000 आणि 50,000 रुपये अशा दोन नोटीसा पाठवल्या. महापालिकेने या पाण्याच्या उपशासाठी 1.15 लाखांचा खर्च दाखवून त्याची वसुली पाखरे यांच्याकडून करण्याचा आदेश दिला.

आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून
महानगर पालिका झाल्यानंतर नागरिकांकडून वसुलीचा सपाटा लावला जात आहे. नुकतेच मनपा प्रशासनाने अनाधिकृत नळ कनेक्शनसाठी तिर्‍हाईत मार्फत नोटीसा पाठवून दहा हजारांची वसुलीच्या माध्यमातून कोटींचा कर वसुल केला. त्यानंतर आता अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सामान्य नागरिकांकडून भरपाई पोटी नोटीसा पाठविल्या आहेत. केवळ पाखरे यांनाच मनपा ने नोटीस पाठविली की, अन्य इतरांनाही नोटीसा पाठविण्यात आला याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, जर मनपा अशाच पद्धतीने कारभार करणार असेल. तर मनपा ऐवजी जालना ही नगर पालिका बरी होती असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आता आली आहे. मनपाने सुविधा पुरविण्यावर भर देणे गरजेचे आहे. नगर रचनाकार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या हलगर्जीपणामुळे जालनेकरांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. ती भरपाई खरे तर जालना शहर महानगर पालिकेेने देणे आवश्यक आहे. मनपाच्या आयुक्तांपासुन जबाबदार विभाग प्रमुख व स्वच्छता निरीक्षकांच्या संपत्ती जप्त करुन जालनेकरांच्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी आता जनतेतून होत आहे. मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून.

जॉन्सन पाखरे यांनी संतप्त होत सांगितले की, माझे घर पावसाने उद्ध्वस्त झाले, संसार उघड्यावर आला. अशा वेळी मदत करायला हवी होती, पण महापालिका मात्र नोटीसा पाठवून खंडणी वसूल करत आहे. नोटीस मागे घेतली नाही तर महापालिका आयुक्तांसमोर आत्मदहन करीन, असा इशारा त्यांनी दिला.
शहरातील नागरिकांनी महापालिकेच्या या कारभाराची निजामी वसुली अशी तुलना केली.  सेवा देण्याऐवजी सामान्यांना त्रास देणारे आदेश काढले जात आहेत, अशी टीका होत आहे.
महापालिका नागरिकांची सेवा करते की खंडणी वसूल करते? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

पालिकेचे काम म्हणजे शहरातील अडचणी सोडवणे, पाणी काढणे, स्वच्छता राखणे. मात्र, आता नागरिकांनाच खर्चाची जबाबदारी लादण्याची पद्धत सुरू झाली तर गरीबांचे जगणे आणखी कठीण होणार आहे.
या घटनेतून प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, महापालिकेने तातडीने नोटीसा मागे घेऊन पाखरे यांना मदत करावी, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे. 

Read More रक्षकच बनताहेत भक्षक; चोरी 1.75 लाखाची दाखवली फक्त 25 हजारांची ?

Related Posts

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!