जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन

जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन

जालना  । प्रतिनिधी -  जालना जिल्ह्यात 15 सप्टेंबर 2025 रोजी मुसळधार पावसामुळे शहरातील झोपडपट्टी निवासी नागरिकांचे अनेक घर उद्ध्वस्त झाले. यामुळे गोरगरीब, मोलमजुरी, छोटे व्यापारी यांचे घर व सामग्री मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जालना शहर उपाध्यक्ष तय्यब बापु देशमुख यांनी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्याकडे निवेदन करून तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनातील मुख्य मुद्दे:
झोपडपट्टीतील पुनर्वसन आवश्यकता, मुसळधार पावसामुळे झोपडपट्टी निवासी अनेक नागरिकांचे घर उद्ध्वस्त झाले., शासनाकडून पुनर्वसन सहायता देण्यात यावी, अशी विनंती.
महानगरपालिकेची नाले व्यवस्था अपुरी:
शहरातील सांडपाणी जाण्यासाठी नाले व नाल्यांची माहिती महानगरपालिकेकडे नाही. काही वर्षांपूर्वी जुन्या नाल्यांच्या जागी अंडरग्राऊंड पाईप लाईन बसवण्यात आली, पण सांडपाणी प्रेशात जात नाही; पाईप पटकन चौकप होतात. काही झोपडपट्टींमध्ये खदानी असल्याने पाईपातून पाणी उलट घरात शिरते. महानगरातील काही भागांमध्ये 2-3 दिवस पाऊस चालू राहिला, तर शहर जलमय झाले.
दुर्दशेतले महत्त्वाचे इमारती व पूल: 
फुलंब्री नाट्यगृहाची स्थिती बिकट; दुरुस्ती करण्याची आवश्यकता., लकडकोट पुल नादुरुस्त; संभाव्य धोकादायक, नवीन पुल करणे गरजेचे., बसस्थानकाजवळील पुल उंच करावा, रामतिर्थ स्मशानभूमीचा पुल दुरुस्त करावा.
पाणी टाकी आणि आरोग्य:
पाणी टाकीवर ढापे नसल्याने घाण जमते; नागरिकांचे आरोग्य धोक्यात., विसावा शाळा नूतनवहसात पीण्याच्या टाकीत युवकाचा मृत्यू; 20 हजार नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
महानगरपालिकेच्या प्रशासनातील कमतरता: नाले, महावीर मंगल कार्यालय, कोंडवाडा, दर्गा माहीत नसणे. शहरातील जुन्या ऐतिहासिक ठिकाणांची माहिती असूनही प्रशासन योग्य व्यवस्था करू शकत नाही.
जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांना बारकाईने लक्ष देऊन जालना महानगरातील नाले, पाईपलाईन्स, पुल आणि इतर इमारतींचा आढावा घेऊन तातडीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देणे.

झोपडपट्टीतील नागरिकांना पुनर्वसन सहायता उपलब्ध करून देणे.
शहरातील नागरिकांना पावसाळ्यात सुरक्षित राहण्यासाठी सांडपाणी विसर्जनाची सोय सुनिश्चित करणे.
शहरातील महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांचे संरक्षण करणे.

जालना महानगरपालिकेतील व्यवस्थापनातील गंभीर कमतरता आणि पावसाळ्यापूर्वी नाले साफ न केल्यामुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. तय्यब बापु देशमुख यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे निवेदन करून तत्काळ उपाययोजना आणि दीर्घकालीन व्यवस्थापनाची गरज यावर भर दिला आहे, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती टाळता येईल.

Read More आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Related Posts

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!