पावसाचा बदलता चेहरा; दिलासा की धोक्याची घंटा?

पावसाचा बदलता चेहरा; दिलासा की धोक्याची घंटा?

दीपक शेळके 
जालना - जिल्ह्यातील यंदाचा पावसाचा आलेख हा हवामानातील अस्थिरतेचे जिवंत उदाहरण म्हणता येईल. १५ सप्टेंबरपर्यंत पाऊस फक्त १०२ टक्के होता; म्हणजे सरासरीच्या थोडाच जास्त. पण पुढील पाच दिवसांत झालेल्या जोरदार सरींमुळे हा आकडा थेट ११६ टक्क्यांवर पोहोचला. एका आठवड्यातील हा झपाट्याने झालेला बदल शेतकऱ्यांना दिलासा देणारा असला, तरी त्यामागील दडलेला धोका नाकारता येत नाही.
 
उशिरा आलेल्या पावसाने खरीप हंगामाला नवे बळ दिले. सोयाबीन, कापूस, उडीद यांसारखी पिके जिवंत राहिली आणि काही प्रमाणात उत्पादनाचा आधार टिकला. मंठा तालुक्यात जिथे सुरुवातीला पाऊस अपुरा होता, तिथेही २० सप्टेंबरपर्यंत हंगाम सरासरीच्या १०० टक्क्यांवर गेला. ही परिस्थिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे.
 
परंतु, जाफराबाद, बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यांत पाऊस १३० टक्क्यांहून अधिक झाला आहे. या भागात अतिवृष्टीचे संकट आहे. ओलितामुळे कापूस गळ, सोयाबीनचे शेंगकिडे व उडीदपिकाचा रोगराईचा धोका वाढला आहे. म्हणजेच एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे अतिरेकाचा फटका – अशी द्विधा परिस्थिती निर्माण झाली आहे.
 
गतवर्षी याच तारखेला जिल्ह्यात सरासरी ७३८ मिमी पाऊस झाला होता. यंदा ७०० मिमीच्या घरात असून, तो थोडा कमी आहे. मात्र, या कमी-जास्तीतच खरी भीती दडलेली आहे. कारण हवामानाची ही चढ-उतार पिकांच्या जैविक चक्राशी जुळून येत नाहीत.
 
आजच्या घडीला जिल्हा सरासरीपेक्षा जास्त पावसाच्या श्रेणीत आहे. पण यशाचे खरे मोजमाप हे शेतकऱ्यांच्या उत्पादनात आणि उत्पन्नात दिसले पाहिजे. पिकांच्या नुकसानीसाठी त्वरित पंचनामे व मदतकारभार सुरू करणे गरजेचे आहे. अन्यथा, "सरासरीपेक्षा जास्त पाऊस" हा कागदावरील आकडा ठरेल, पण शेतकऱ्याच्या खिशाला मात्र रिकामेपणाचा पाऊस भेडसावेल.
 
पावसाच्या या बदलत्या चेहऱ्याने एकीकडे दिलासा दिला, तर दुसरीकडे धोका निर्माण केला. शासन व प्रशासनाने या स्थितीकडे संवेदनशीलपणे पाहून "अतिवृष्टी व पिकनुकसान" या आव्हानांचा तातडीने सामना करणे हाच खरीप हंगाम यशस्वी होण्याचा मंत्र आहे.

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!