जालना शहरातील पूरस्थिती: व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची महानगरपालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी; माजी आमदार गोरंट्याल यांच्या आश्वासनामुळे व्यापाऱ्यांना दिलासा

जालना शहरातील पूरस्थिती: व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची महानगरपालिकेकडे नुकसान भरपाईची मागणी; माजी आमदार गोरंट्याल यांच्या आश्वासनामुळे व्यापाऱ्यांना दिलासा

जालना | प्रतिनिधी ः जालना शहरात 15 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. या पावसामुळे रेल्वे स्टेशन रोडवरील कृष्णा प्लाझा येथील तळघरातील (अंडरग्राऊंड) दुकानांमध्ये पाणी शिरले. यामुळे व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी महानगरपालिकेच्या नगर रचनाकार आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत, येथील व्यापारी वर्गाने महापालिका आयुक्त यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
या संदर्भात, दैनिक युवा आदर्शचे संपादक दीपक शेळके, जय सावता वस्तू भांडारचे बाबासाहेब गाडेकर, सा. जालना दर्पणचे संपादक संदीप भाकरे, हॉटेल मानसच्या सवित्रा खोतकर, बालाजी स्पोर्ट्सचे तानाजी एलगुंदे, वैभव मंडपचे सूरज ढोलके, सारिका भोजनालयच्या सारिका खोतकर, ॲड. गणेश भा. शेडूते, आर अँड व्ही इंटरप्रायजेस, चिंतामणी इंटरप्रायजेस, शुभम गिरी, प्रतीक मालपाणी, लक्ष्मणराव कुमावत, शरद डिघे, राहुल जाधव, अनिल पवार, सुनील साऊंडचे योगेश पिछाडे, नामदेव मोरे यांच्यासह समस्त व्यापारी वर्गाच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन आयुक्तांना सादर करण्यात आले आहे.

1004331497

निवेदनानुसार, पूरस्थिती ही नैसर्गिक आपत्ती तसेच महानगरपालिकेच्या प्रशासकीय निष्क्रियतेमुळे निर्माण झाली आहे. नगर रचनाकार विभागाने बांधकाम परवानग्या देतांना पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना तपासल्या नाहीत, तर पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने पावसाळ्यापूव गटारे आणि नाल्यांची नियमित व प्रभावी स्वच्छता केली नाही. यामुळेच पाणी थेट दुकानांमध्ये शिरून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
या गंभीर बाबीची दखल घेऊन, तातडीने नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी एक पथक नियुक्त करावे, सर्व नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहराच्या पाणी निचरा प्रणालीची प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. जर या निवेदनावर तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्याचा मार्ग अवलंबवावा लागेल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.


गोरंट्याल यांच्या आश्वासनामुळे व्यापाऱ्यांना दिलासा
माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरातील पाण्यामुळे नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. रेल्वे स्टेशन रोडवरील कृष्णा प्लाझा येथील व्यापाऱ्यांनी त्यांना निवेदन देऊन नुकसानीची माहिती दिली. यावर गोरंट्याल यांनी तात्काळ महानगरपालिका आयुक्तांना यासंदर्भात सूचना दिल्या असून, तातडीने कारवाई करण्याचे सांगितले आहे. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शहराच्या पाणी निचरा प्रणालीमध्ये सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. गोरंट्याल यांनी या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महापालिका प्रशासनासोबत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना दिला आहे. 

Related Posts

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!