बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!

बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!

दीपक शेळके

जालना - समृध्दी महामार्गामुळे जालना जिल्ह्यातील शेकडो शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या. त्यांच्या घराच्या व गार्‍हाण्याच्या जागा उद्ध्वस्त झाल्या. या बदल्यात सरकारने दिली आश्वासने आणि नुकसानभरपाईच्या गोष्टी अजूनही हवेतच विरून गेल्या आहेत. मागील अडीच महिन्यांपासून हे शेतकरी आपली हक्काची मागणी घेऊन रस्त्यावर बसले आहेत. पण दुर्दैव असे की, राज्यातले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप आज आंदोलनकर्ते करत आहेत.
प्रश्न इतकाच नाही की नुकसानभरपाई मिळत नाही. प्रश्न आहे सरकारच्या संवेदनशून्यतेचा! जेव्हा कोणी प्रश्न विचारतो, तेव्हा प्रशासन आम्ही पाहतो, शासनाशी बोलतो अशा उडवाउडवीच्या प्रतिक्रिया देत आहे. त्यातच 16 जुलै रोजी जिल्हा बंद आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा ही स्थिती गंभीर आणि धोकादायक आहे. एका लोकशाहीत, आपले लोकप्रतिनिधी, लोकांच्या निवडून गेलेल्या सरकारने अशा टोकाच्या पावलांची वाट पाहणं ही खरोखरच लोकशाहीची थट्टा आहे.

96588e31-2a7b-40c0-8a0e-b744ace5aaf6 copy

या सगळ्या प्रकरणात शासनाचा हलगर्जीपणा स्पष्ट जाणवतो. एखादा महामार्ग काढताना जनतेला विश्वासात घेणं, योग्य मोबदला देणं, पुनर्वसनाची व्यवस्था करणं ही सरकारची जबाबदारी असते. परंतु येथे ती पूर्णतः झुगारण्यात आली आहे. हा लढा कुठल्याही पक्षविरोधात नसून अन्यायाविरोधात आहे, हे सरकारला समजायला हवं.
लोकशाहीत आंदोलन हे शस्त्र आहे, पण शासनाने ते इतकं दुर्लक्षित केल्यास लोकांना टोकाचा मार्ग निवडण्याशिवाय पर्याय राहत नाही, हे राज्यासाठी लाजिरवाणं आहे.
आज या आंदोलनाचा आवाज केवळ जालना जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला नाही, तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला आहे. शासनाने आता तरी जागं होऊन शेतकर्‍यांशी तातडीने चर्चा करून, न्याय्य तोडगा काढावा. अन्यथा उद्या या आगीत केवळ शेतकरीच नव्हे, तर सरकारची विश्वासार्हताही होरपळून निघेल.

आताच्या स्थितीत आंदोलनाचे रूप दिवसेंदिवस टोकाचं होत चाललं आहे. ही वेळ चर्चा आणि निर्णयाची आहे, दबावाने मोडण्याची नव्हे. कारण शेवटी जनता हीच या लोकशाहीची खरी मालक आहे.

Read More डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा...  तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्‍यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्‍यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय आत्मदहन

आमच्या जीवाला भाव नाय का? एका समृध्दी महामार्ग बाधित शेतकर्‍याच्या मनातलं

आमचं गाव, आमची शेती, आमचं घर सगळं गेलं. फक्त आश्वासनं मिळाली. पोरांच्या शिक्षणाची फी थकलीय, घरात आजारी आई औषधाच्या पैसे थकल्यात आणि समोर सरकारकडून निव्वळ वावडं. अडीच महिने झाले आंदोलनाला बसून. उन्हात, पावसात, दिवसा-रात्री रस्त्यावर. एव्हाना किमान कुणीतरी विचारेल, म्हणेल बाबांनो, तुमचं ऐकून घेऊ - पण इथं सत्ताधार्‍यांना वेळच नाही. ना मुख्यमंत्री येतात, ना उपमुख्यमंत्री - फक्त पोलीस पाठवतात.

Read More अन् व्हायरल व्हिडिओ वरील कमेंट ने पोलिसांची उरली सुरली इज्जत ही उतरली... 'याच्या आई बापानं याचं बारसं घातलं नाही ये'... अन्य कमेंट नक्की वाचा...

सारं जग पुढं चाललंय. पण आम्ही मात्र आपल्या जमिनीच्या नावानं रडतोय. का? कारण ही जमीन आमच्यासाठी फक्त पैसा नाही, ती आमचं जगणं आहे.
आज आम्ही 16 जुलैला जिल्हा बंद आणि सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय. हे कुणालाही आवडणार नाही, पण आम्ही कशासाठी जगावं? सरकार आमचं काही ऐकणार नसेल, तर या जगण्यात अर्थ काय? आम्ही बेकार आहोत, असं वाटतं सरकारला? कधी एकदा लावतात की आग आमच्या झोपड्यांना, मग बघा पेटणारे आमचे अंगारलेले मन. आम्ही आमच्या जमिनीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढू.  शेवटी एवढंच सांगतो - आमच्या जीवाला भाव द्या. अन्यथा तुमच्या राजवटीवर एक दिवस असा येईल की हेच तुडवले गेलेले शेतकरी पायदळीच उचलून फेकतील.

Read More अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी - देवेंद्र भुजबळ 

LatestNews

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड
गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी
बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद
बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे थाटात उद्घाटन
तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 
ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस