डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा...  तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्‍यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्‍यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय आत्मदहन

डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा...  तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्‍यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्‍यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय  आत्मदहन

जालना । प्रतिनिधी - ‘समजानेसे अगर लोग समजते तो बासुरीवाला महाभारत नही होणे देता’ हे बुधवारचे महाभारत होऊ द्यायचे नसेल तर शासनाने वेळीत तोडगा काढवा, अन्यथा गुरे-ढोरे, वाहणे, शेतजमिनी ह्या जिल्हाधिकार्‍यांच्या हक्कात दानपत्र लिहून देऊन त्याच ठिकाणी आत्मदहन करण्याचा ईशारा शेतकरी संघर्ष समितीचे दिलीप राठी यांनी सोमवार (दि 14) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी श्री राठी यांनी ही शेवटची भेट समजा असे म्हणतांना त्यांचे डोळे पाणावले होते तर कंठ ही दाटून आला होता.  या पत्रकार परिषदेला गणेश महाराज कोल्हे, बळीराम कदम आदींसह शेतकर्‍यांची उपस्थिती होती. 

जालना तालुक्यातील जवळपास तीनशेवर शेतकर्‍यांनी दिलीप राठी यांच्या नेतृत्त्वात शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने आंदोलन सुरु केले आहे. समृद्धी बाधीत शेतकर्‍यांच्या धरणे आंदोलनाला 75 दिवस पूर्ण होत आहेत. असे असले तरी शासनाने जमिनीच्या रास्त मुल्यांकनाचा प्रश्‍न सोडवलेला नाही. दिलीप राठी यांच्या आंदोलनाला व्यापारी संघटनांनी सामाजिक संघटनांनी समर्थन दिलेले आहे.अडीच महिन्यांनंतरही शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती श्री राठी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री राठी म्हणाले की, पहिल्या टप्प्यात झालेल्या आंदोलनादरम्यान आ. अर्जुनराव खोतकर यांनी मध्यस्थी केली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. त्यामुळे शासनाला एक महिन्याचा वेळ देऊन आंदोलन स्थगित केले होते. मात्र, महिन्याभरानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा दुसर्‍या टप्प्यात आंदोलन सुरु करावे लागले या आंदोलनाला आता अडीच महिने होत आहेत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे का अडून बसले हे कळायल मार्ग नाही. मध्यंतरी शासनाने 67 लोकांची कामे केल्याचे सांगितले मुळात त्यांनी 67 कामे केली ती केवळ 20-25 शेतकर्‍यांची होती. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भरभरून निधी देत आहेत त्यांच्याकडे तिजोरीच्या चाब्या आहेत. मात्र, मराठवाड्याकडे दूर्लक्ष करत आहेत. 

सभागृह सुरु होऊन दोन आठवडे झालेत. आ. अर्जुनराव खोतकर यांनी सभागृहात मुद्दा मांडला असला तरी त्यावर ठोस निर्णय अद्याप झालेला नसल्याचेही श्री राठी यावेळी म्हणाले. येत्या 16 तारखेला शेती अवजारे, गुरे-ढोरं, वाहने ही दानपत्रात जिल्हाधिकारी पांचाळ यांच्या नावे करुन त्याच ठिकाणी आत्मदहन करणार असल्याचा ईशारा त्यांनी यावेळी दिला.  मुख्यमंत्र्यांकडेच गृह खाते आहे त्यामुळे ते आंदोलन हाणून पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करतील मात्र, आम्ही ठाम आहोत. जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व दानपत्रात लिहून देऊन आत्मदहन करणार आहोत. जर मध्ये कुठे अडवणूक करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने केला तर ज्या ठिकाणी अडवतील त्याच ठिकाणी आत्मदहन करू. 

Read More अन् व्हायरल व्हिडिओ वरील कमेंट ने पोलिसांची उरली सुरली इज्जत ही उतरली... 'याच्या आई बापानं याचं बारसं घातलं नाही ये'... अन्य कमेंट नक्की वाचा...

आत्मदहनाच्या ईशार्‍याऐवजी आमदारांचा राजीनामा का मागत नाहीत असा प्रश्‍न श्री राठी यांना विचारला असता ते म्हणाले की, 16 तारखेपुर्वी निर्णय झाला नाही तर होणार्‍या आंदोलनामुळे जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल आणि याची संपूर्ण जबाबादारी ही मुख्यमंत्र्यांसह जिल्ह्यातील आमदारांची राहील आणि त्यानंतर आमदारांचाच काय तर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा ही राज्य मागेल. 

Read More अधिस्वीकृती पत्रिकेसाठी असलेली कोटा पद्धत रद्द करावी - देवेंद्र भुजबळ 

पुढार्‍यांनी लक्ष दिले नाही याची खंत - राठी 
जालना जिल्ह्याचा विचार करता येथे पाच आमदार आहेत. त्यापैकी समृद्धी बाधीत शेतकर्‍यांच्या जमिनी असलेल्या जालना, घनसावंगी, परतूर या ठिकाणचे आमदार आहेत. असे असले तरी आ. अर्जुनराव खोतकर यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही आमदारांनी विधानसभेत प्रश्‍न लावून धरला नाही. येत्या 16 तारखेला होणारे आंदोलन हे शेवटचे आंदोलन असून ज्यांनी ज्यांनी आमचे म्हणजेच शेतकर्‍यांचे प्रश्‍न लावून धरले. त्या सर्वांचे आभार व्यक्त केले. मात्र, ज्या पद्धतीने पुढार्‍यांनी प्रश्‍न लावून धरायला पाहिजे होते तसे धरले नाहीत. तेथे ते कमी पडल्याची खंत श्री राठी यांनी व्यक्त केली.

LatestNews

रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज २०२५-२६ च्या अध्यक्षपदी रो रुपाली यादव यांची निवड
गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाच कुंटुंबातील ५ जण जखमी
बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद
बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे थाटात उद्घाटन
तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 
ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस