"तुमचं टाळकं ठिकाणावर आणलं आहे" – खोतकर यांची आक्रमक भूमिका; ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक

खोतकरांचा महावितरण कंपनीवर घणाघात; ठेकेदारांनाही झणझणीत फैलावर

ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत जालना जिल्ह्यात वीजविषयक आढावा बैठक

जालना  - जालना जिल्ह्यातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रश्नावर आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ऊर्जा राज्यमंत्री मेघनाताई साकोरे (बोर्डीकर) यांच्या उपस्थितीत झालेल्या या आढावा बैठकीत आमदार अर्जुनराव खोतकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना जोरदार फैलावर घेतले.

बैठकीत बोलताना आमदार खोतकर म्हणाले, "मी स्वतः या समस्यांवर विधानसभेत आवाज उठवला, तरीसुद्धा अधिकारी ढिम्म आहेत. जालना शहरात वीज दिवसातून ५० वेळा जाते. जनता संतप्त आहे आणि आम्हालाच शिव्यांचा सामना करावा लागतो."

महावितरणने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांनंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने, त्यांनी या कामांतील गंभीर गैरव्यवहार, अपारदर्शकता व ठराविक लोकप्रतिनिधींच्या मर्जीप्रमाणे काम करणं यावर संताप व्यक्त केला.

ऊर्जा राज्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना स्पष्ट सुनावणी

ऊर्जामंत्री मेघनाताई साकोरे यांनीही आमदार खोतकर यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले. त्या म्हणाल्या, "जालना शहरातील वीज प्रश्न तात्काळ सुटला नाही, तर अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता जबाबदार धरले जातील. बनावट व बोगस काम करणाऱ्या एजन्सींवर गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्टेड केले जाईल."

Read More जालन्यात गोरंट्यालांचा भाजपकडे झुकाव! खोतकरांची चिंता वाढणार ! – भाजपकडून जालना महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवण्याचा निर्णय?

त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असून, प्रलंबित कामांमध्ये गती आणण्याचे आदेश दिले.

Read More “दोन दिवसांचा उजेड, आणि मग पुन्हा अंधार!” ;  जालना महावितरणचा 'शॉर्ट सर्किट' कारभार; आमदारांच्या दणक्याचं लाईफ स्पॅन दोन दिवस?

"फक्त फायलीत कामं नकोत, कृती हवी" – खोतकरांचा इशारा

“जनता अंधारात, आणि यंत्रणा फक्त फायलींमध्ये गढलेली आहे, हे आम्हाला मान्य नाही. जर काम करत नसाल, तर परिणाम भोगण्यास तयार राहा,” असा इशारा खोतकर यांनी दिला. यावेळी ठेकेदारांनाही फटकारत त्यांनी विकासकामांत पारदर्शकता व वेळेचे भान ठेवण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्दे:

  • महावितरणच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांनंतरही वीज समस्या सुटलेल्या नाहीत.

  • कामांमध्ये दर्जा, वेळ व पारदर्शकतेचा अभाव – खोतकर यांची स्पष्ट टीका.

  • ऊर्जा राज्यमंत्रींचा स्पष्ट इशारा: "शिस्तभंगासह गुन्हे दाखल करू."

  • ठेकेदारांनाही प्रामाणिकपणा राखण्याचे आदेश.

  • वीज प्रश्न कायम राहिल्यास आंदोलनाचा इशारा.

बैठकीस उपस्थित अधिकारी आणि मान्यवर:

या बैठकीस आमदार नारायणराव कुचे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिन्नू के. पी., एसी सरग, कार्यकारी अभियंता पेन्सलवार यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LatestNews

विज्ञान संघटनेचे उद्घाटन आणि पोस्टर्सचे प्रदर्शन
छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात २०२५ च्या शैक्षणिक प्रबोधन सप्ताहाची सांगता
पनवेल भगिनी समाज सामाजिक संस्थेची शतकपूर्ती
नेरे येथील गिरिजा आश्रम येथून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता
पोलीस असल्याची बतावणी करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड
सराईत रिक्षा चोर अक्षय चव्हाण गजाआड
आमचं ठरलंय... सेठ जिथं, आम्ही तिथं! काँग्रेस पदाधिकार्‍यांचा निर्णय; काँग्रेसला रामराम, कैलास गोरंट्याल यांचा 31 जुलै रोजी भाजप प्रवेश निश्चित