मंठा तालुक्यात मुसळधार पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान ; – शिवश्री बाळासाहेब खवणे यांची तहसीलदारांना तातडीच्या मदतीची मागणी
मंठा | प्रतिनिधी - मंठा तालुक्यात रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेतीचा मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला असून, अनेक गावांतील उगवती पिके वाहून गेली, शेतजमिनी खरडून गेल्या आणि शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका

प्रमुख मागण्या:
- तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांची यादी तयार करावी.
-
पात्र शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी.
-
दुसऱ्यांदा पेरणीसाठी बी-बियाणे आणि खते मोफत किंवा सवलतीत उपलब्ध करून द्यावीत.
-
आपत्ती व्यवस्थापन निधीतून सरसकट मदतीचा निर्णय घ्यावा.
-
पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक आणि मंडळ अधिकारी यांच्या संयुक्त पथकांमार्फत पारदर्शकपणे करावेत.
“प्रशासनाने संवेदनशीलता दाखवावी” – खवणे यांचा इशारा
शिवश्री खवणे यांनी तहसील प्रशासनाला इशाराही दिला की, "जर तात्काळ उपाययोजना न झाल्यास शेतकऱ्यांपुढे उपजीविकेचा गंभीर प्रश्न उभा राहील. प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून या संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा."
मंठा तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाने त्वरेने हस्तक्षेप करून मदतीचे उपाययोजनांचे पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

About The Publisher
