मोफत वाळू धोरणात वाहतूक खर्च ठरणार अडथळा; तेलंगणातील ग्रॅनाईट खाणींसारखे पारदर्शक व मजबूत धोरण महाराष्ट्रात लागू झाले, तरच लोकांना न्याय मिळेल - आ. लोणीकर

मोफत वाळू धोरणात वाहतूक खर्च ठरणार अडथळा; तेलंगणातील ग्रॅनाईट खाणींसारखे पारदर्शक व मजबूत धोरण महाराष्ट्रात लागू झाले, तरच लोकांना न्याय मिळेल - आ. लोणीकर

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोफत वाळू धोरण जाहीर केले आहे. शासनाने ही योजना लागू केली असली तरी तिच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शासन धोरणातील मुख्य मुद्दे

प्रत्येक घरकुल योजनेतील लाभार्थ्याला मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद.

वाळू उत्खननासाठी पर्यावरण विभागाचे नियम लागू राहतील. दरवर्षी 9 जूनपासून उत्खनन बंद, पावसाळ्यानंतरच परवानगी.

Read More हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार

प्रत्येक लाभार्थ्याला वाळूचा पास थेट तलाठीमार्फत घरी पोहोचवला जाणार.

Read More  “हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी

जिल्ह्यानिहाय नदी पात्र निश्चित करून वाळू पुरवठा करण्याचा शासनाचा निर्णय.

मोफत वाळू धोरणावर आक्षेप नोंदवित आमदार बबनराव लोणीकर यांनी सभागृहात ठाम भूमिका मांडली.

आमदार बबनराव लोणीकर म्हणाले:
“प्रत्येक जिल्ह्यात फक्त एका नदीतून वाळूचा पुरवठा करण्याचे धोरण चुकीचे आहे. वाहतुकीचा खर्च प्रचंड वाढतो, त्यामुळे मोफत वाळूचा खरा लाभ लोकांपर्यंत पोहोचत नाही. गोदावरी, पूर्णा, दुधना व इतर सर्व नद्यांमधून उत्खननास परवानगी द्यावी. तेलंगणा राज्यातील ग्रॅनाईट खाणींसारखे पारदर्शक व मजबूत धोरण महाराष्ट्रात लागू झाले, तरच लोकांना न्याय मिळेल.”

मोफत वाळू योजना जाहीर होऊन सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असले तरी वाहतुकीचा प्रश्न, नदी निवडीतील मर्यादा आणि प्रत्यक्ष लाभाबाबतचे प्रश्न अजूनही कायम आहेत. लोणीकर यांनी सुचविल्याप्रमाणे जर प्रत्येक तालुक्यातील नद्यांमधून वाळू उत्खननास परवानगी मिळाली, तरच या योजनेचा उद्देश सफल होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LatestNews

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन; दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन
अस्मानी संकटाची छाया; जालन्यात रेड अलर्ट जारी, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे नागरिकांना आवाहन; आमदार बबनराव लोणीकर व आमदार अर्जुनराव खोतकर यांनीही केली काळजी घेण्याची विनंती
आधार ग्रुपच्या वतीने आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे शिक्षण उपनिरीक्षक भारत पालवे यांचा सत्कार
जालना महानगरातील मुसळधार पावसामुळे झोपडपट्टीतील नागरिक संकटात; तय्यब बापु देशमुख यांच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना निवेदन
“हर भारतीय का बँक आणि भारतीयांनाच त्रास”? RBI ने लक्ष घालण्याची मागणी
मनपाचं आता असं झालयं आपलं ठेवा झाकून अन् जनतेचे पहा वाकून... रिकाम्या प्लॉटवरील पाणी; महापालिकेची अनोखी जनसेवा!