परशुराम आर्थिक विकास महामंडळाला महायुती सरकारकडुन 50 कोटीची तरतूद

माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नाला यश

परशुराम आर्थिक विकास महामंडळाला महायुती सरकारकडुन 50 कोटीची तरतूद

जालना । प्रतिनिधी - परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी  बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी सतरा वर्षांपूर्वी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्याकडे परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा अशी मागणी केली होती.

महायुती सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले असून ब्राह्मण समाजाच्या वतीने माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा सत्कार करण्यात आला होता.

ह्या सत्कारदरम्यान माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी बोलतांना सांगितले होते की, परशुराम आर्थिक विकास महामंडळास जास्तीत जास्त आर्थिक तरतूद कशी होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची प्रतिपादन खोतकर यांनी केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून परशुराम विकास महामंडळाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ जास्तीत जास्त तरतूद करून द्या अशी मागणी माजी मंत्री खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे केली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी परशुराम  महामंडळाला 50 कोटीची  तरतूद करून दिली आहे. 

माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रयत्नाला पुन्हा यश आले आहे. ब्राह्मण समाजाच्या वतीने माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे  बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, अ‍ॅड. सुनील किनगावकर. भगवान पुराणीक, रवींद्र देशपांडे यांनी सत्कार करून आभार व्यक्त केले आहे.

Read More वादग्रस्त अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपुत जालना मनपातून ‘रिक्त’, पत्रकारांशी असभ्य वागणूक; कामात भेदभाव; टक्केवारीचाही झाला होता आरोप

65656

LatestNews

बघ्याची भूमिका सोडा, शेतकर्‍यांच्या जिवाशी खेळ थांबवा!
महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांची जागतिक वारसा स्थळात नोंद
बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे थाटात उद्घाटन
तत्कालीन  न.प. जालनाच्या शेवटच्या सभेतील आयत्या वेळी घेण्यात आलेल्या नियमबाह्य विषयाची चौकशी करा - अर्जुनराव खोतकर 
ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ कारवाई करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
डोळे पाणावले, कंठ दाटला... ही शेवटची भेट समजा...  तर जालन्याला बट्टा लागेल, महाराष्ट्र बदनाम होईल - राठी सर्व शेतकर्‍यांची गुरे-ढोरे, वाहने, शेतजमिनीचे जिल्हाधिकार्‍यांना दानपत्र लिहून देणार; शेवटचा पर्याय आत्मदहन
अन् व्हायरल व्हिडिओ वरील कमेंट ने पोलिसांची उरली सुरली इज्जत ही उतरली... 'याच्या आई बापानं याचं बारसं घातलं नाही ये'... अन्य कमेंट नक्की वाचा...