कोट्यवधींचे नुकसान, जनतेचे हाल; भाजपाची तातडीच्या मदतीसाठी मागणी, जालना आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करा - भास्कर दानवे
By Yuva Aadarsh
On
जालना | प्रतिनिधी - जालना तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत पाणी साचून नागरिकांच्या घरात पाणी घुसले, तर व्यापार, व्यवसाय व शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. शहरातील बाजारपेठा, दूकाने, घरगुती साहित्य, शेतीमाल व वाहने यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानाची आज (दि.१८) रोजी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी लक्कडकोट परिसर, हनुमानघाट, खांडसरी परिसर, सेंटमेरी शाळेमागील परिसर, इदगाह रोड परिसर या सह शहरातील अनेक भागात पाहणी केली.


यावेळी जिवन सले, धनराज काबलिये, सुनील खरे, संजय डोंगरे, वसंत शिंदे, अमोल कारंजेकर, दुर्गेश कुरील, कल्याण भदनेकर, गेंदालाल झुंगे, सोमेश काबलीये, हेमंत भूरेवाल, विकास कदम, शाम उगले, रोहित नलावडे, अमन मित्तल आदींची उपस्थिती होती.

About The Publisher
